श्रीगोंदा | नगर सह्याद्री- श्रीगोंदा तालुयातील बेलवंडी पोलीस ठाण्यांतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड (वय ४...
श्रीगोंदा | नगर सह्याद्री-
श्रीगोंदा तालुयातील बेलवंडी पोलीस ठाण्यांतर्गत अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्तीवरील कल्याण मच्छिंद्र गायकवाड (वय ४२) यांच्या घरी १३ मार्चला मध्यरात्री ५ ते ६ दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. त्यामध्ये सुमारे पाच हजार रुपये रोख रकमेसह एक तोळे सोन्याचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांकडून कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांना टणक हत्याराने डोयात झालेल्या जबर मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मुलीच्या कानातील सोन्याचा ऐवज दमदाटी व मारहाण करून हिसकवला. घरातील रोख रक्कम ५ हजार रुपये घेतले. यामध्ये कल्याण गायकवाड यांनी दरोडेखोर यांना प्रतिकार केला असता त्यांनी त्यांच्यावर प्रतीहल्ला करत टणक हत्याराने जबर मारहाण केली. यामध्ये त्याच्या डोयाला गंभीर जखम झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.याची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तदनंतर पंचनामा करून कल्याण गायकवाड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
बेलवंडी पोलीस ठाण्यासमोर अरणगाव येथील नागरिकांनी खुनाच्या गुन्ह्यातील दरोड्याचा तपास लागत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला. त्यातच बेलवंडी पोलीस स्टेशनला एकाच महिन्यात तीन पोलीस निरीक्षक आल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याने बेलवंडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
COMMENTS