नवी दिल्ली वृत्तसंस्था- मध्य प्रदेशमध्ये गुरूवारी मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. गुरुवारी रामनवमीचा उत्सव सुरू असताना सकाळी ११.३...
नवी दिल्ली वृत्तसंस्था-
मध्य प्रदेशमध्ये गुरूवारी मोठी दुर्घटना घडल्याची बातमी समोर अली आहे. गुरुवारी रामनवमीचा उत्सव सुरू असताना सकाळी ११.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. मंदिरात असलेल्या पुरातन विहिरीचं छत अचानक कोसळून भाविक या विहिरीत पडले. या घटनेत आत्तापर्यंत ३५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य हाती घेतलं आहे. रात्री उशिरा या विहिरीतून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले.
वृत्तसंस्थाच्या माहिती नुसार, इंदूरमधल्या स्नेहनगरमध्ये पटेलनगर हा भाग आहे. या ठिकाणी बेलेश्वर मंदिर आहे. या मंदिरात खूप आधीपासून ही विहिर आहे. भाविक रामनवमीच्या उत्सवासाठी या ठिकाणी जमले होते. मात्र विहिरीचं छत कोसळून अपघात झाला आहे त्यामुळे अनेक भाविक या ठिकाणी अडकले. या घटनेत आत्तापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती ANI ने दिली आहे. विहिरीचं छत कोसळून हा अपघात झाला आहे. जो विहिरीचा भाग होता त्यावर मंदिर होतं. रामनवमीचा उत्सव सुरू असताना हा अपघात झाला. या घटनेबद्दल देशभरातून दुःख आणि हळहळ व्यक्त होते आहे.
बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा उत्सव सुरू असताना दुर्घटना घडली त्यानंतर आता इथे मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मदत आणि बचावकार्यासाठी १४० जणांचं पथक काम करतं आहे. ज्यामध्ये १५ जवान एनडीआरएफचे आहेत. ५० जवान एसडीआरएफचे तर ७५ लष्कराचे जवान आहेत.या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. जो कुणी यासाठी जबाबदार असेल त्याला माफ केलं जाणार नाही. आम्ही तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत असंही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केलं आहे.
COMMENTS