अहमदनगर | नगर सह्याद्री संपूर्ण राज्यभर सरकारी कर्मचार्यांचा संप चालू आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचाही सहभाग आहे. सध्याचा कालखं...
अहमदनगर | नगर सह्याद्री
संपूर्ण राज्यभर सरकारी कर्मचार्यांचा संप चालू आहे. त्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचाही सहभाग आहे. सध्याचा कालखंड विद्यार्थ्यासाठी शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पद्मश्री पोपटराव पवार यांच्या पुढाकारातून हिवरे बाजार येथे अभिनव उपक्रम राबविला जात आहे. ग्रामस्थच अध्यापनाचे काम करत आहेत.
पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव हिवरे बाजार येथील सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी, सोसायटी चेअरमन व सदस्य, शिक्षक पालक संघाचे सदस्य व गावातील सुशिक्षित पालक तसेच कोविड काळातील फ्रंटलाईन टिम संप सुरू झाल्यापासून अध्यापनाचे काम करत आहेत. कोविड काळातही संपूर्ण देशभर शाळा बंद असताना हिवरे बाजारमध्ये १५ जून ते १५ एप्रिल या शैक्षणिक वर्षात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून ऑफलाईन शाळा सुरू ठेवली होती. त्याचाच परिणाम प्राथमिक शाळेतील २४ विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत व यशवंत माध्यमिक विद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील १४ विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागात शाळेतील सर्व विद्यार्थी शेतकरी, कष्टकरी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. त्यांना इतर कुठलीही खासगी लासेस वगैरे सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्य हे शिक्षकांवर आणि शाळेवरच अवलंबून असते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामस्थामार्फत प्राथमिक शाळा सकाळी ७.३० ते ११ व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १२ या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या संपात सहभागी असलेले शासकीय कर्मचार्यांच्या न्याय मागण्यांचा शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली.
COMMENTS