मुंबई | नगर सह्याद्री - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्याला सुरुवात झाली. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ ...
मुंबई | नगर सह्याद्री -
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्या आठवड्याला सुरुवात झाली. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाळीव प्राण्यांसह शेतपीके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा स्थगन प्रस्ताव आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला.यापार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सविस्तर माहिती दिली आहे.
फडणवीस म्हणाले, अवकाळी पावसामुळे एकूण आठ जिल्ह्यांमध्ये साधारण १३,७२९ हेटर एवढं नुकसान झालं आहे. पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागात ७६० हेटरमध्ये आंबा आणि काजूचं नुकसान झालंय. नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्रंबकेश्वर, निफाड या भागांत २,६८५ हेटरवर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचं नुकसानं झालं आहे.
धुळ्यात साखरी, शिनखेडा, शिरपूर ३१४४ हेटरचं नुकसानं झालं आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपई याचं नुकसान झालं आहे. नंदुरबारमध्ये नंदुरबार, नवापूर, अक्कलकुव्वा, शहादा, तळोदा, अक्रानी इथं १,५७६ हेटरचं मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, आंबा याचं नुकसान झालं आहे. जळगाव इथं भुसावळं, धरणगाव इथं २१४ हेटरवर गहू, मका, ज्वारी, केळी याचं नुकसानं झालं आहे.
अहमदनगर जिल्ह्यांत राहुरी, नेवासाअकोले, कोपरगाव इथं ४,१०० हेटरवर मका, गहू, कांदा, भाजीपाला याचं नुकसानं झालं आहे. तर बुलडाण्यात नांदुरा इथं ७७५ हेटरवर मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा याचं नुकसान झालं आहे. वाशिममध्ये ४७५ हेटरवर चार तालुयांत गहू, हरभरा, फळपिकं असं एकूण १३,७२९ हेटरवर नुकसान झालेलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी इतर भागात झालेल्या नुकसानाची उल्लेख केला. त्यावरू फडणवीस म्हणाले, हा राजकारण करण्याचा विषय नाही. आतापर्यंत आलेली ही सगळी माहिती आहे. मदतीसंदर्भात तात्काळ प्रस्ताव मागवले आहेत. या सगळ्या ठिकाणी तात्काळ मदत करण्यात येईल आणि उर्वरित माहिती घेऊन सगळं निवेदन केलं जाईल.
COMMENTS