मुंबई। नगर सहयाद्री - राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँड...
मुंबई। नगर सहयाद्री -
राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये दिलेल्या पाठिब्यांचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मंत्री गुलाबराव पाटील यांनी नागालँडमध्ये पन्नास खोके, एकदम ओके झाल्याचा आरोप केला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेप घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कशी दुटप्पी असल्याचे ते सांगितले. शिवाय काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, असे सूचक वक्तव्य केले.
गुलाबराव पाटील म्हणाले, देशामध्ये आणि राज्यामध्ये बदलाचे वारे वाहायला लागले असे बरेच स्टेटमेंट पेपरामधून आणि टीव्हीतून बघतोय. नागालँडमध्ये राज्यातला जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी भाजपच्या फक्त मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिलेला आहे. फक्त मुख्यमंत्र्यांना. बदलाचे वारे पाहा कसे वाहायला लागले.
बदलाचे वारे एकदम कसे वाहिला लागले आता 50 खोके नागालॅंड ओके, असे म्हणा असे गुलाबराव पाटील यांनी सुनावले. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उत्तर दिले. नागालॅंड येथील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सगळे सरकार सहभागी होतात या आधी झाले आहे. विनाकारण येथे का चर्चा? असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणले पाहिजे असे नाही. अध्यक्ष महोदय आज केंद्र सरकार त्यांच्या ताब्यात आहे. राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे. सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. चौकशी करा ना, ही कुठली पद्धत काढली. केंद्र आणि राज्य सरकार तुमच्या हातात आहे. कारण नसताना बदनामी करू नका.
अजित पवार पुढे म्हणाले की, इशान्येच्या राज्यांची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तिथे सगळे मिळून सर्वपक्षीय सरकार स्थापन करतात, अशी तिथली परंपरा आहे. भारतातला तो भाग, भारतातच राहण्यासाठी भारतीय म्हणून निर्णय घेतलेला आहे. त्याची चर्चा इथे करून गैरसमज निर्माण करायचा काहीच कारण नाही.
COMMENTS