संगमनेर | नगर सह्याद्री अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोयात सत्तेची हवा गेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू ...
संगमनेर | नगर सह्याद्री
अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोयात सत्तेची हवा गेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. राजकीय सुडापोटी जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणार्यांनी धमया आणि दादागिरी संगमनेर मध्ये चालणार नाही, हे लक्षात ठेवावे. आमच्या शांततेचा अंत बघू नका. तुमच्या दहशतीचे झाकण उडवायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा सज्जड इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्र्यांना दिला.
संगमनेर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. थोरात म्हणाले, लोकप्रतिनिधी या नात्याने प्रत्येक आमदाराला काही अधिकार आहेत. नगर जिल्ह्यात विद्यमान पालकमंत्र्यांकडून या अधिकारांची पायमल्ली केली जाते. लोकप्रतिनिधीला न कळवता परस्पर बैठका घेतल्या जात आहेत. आपल्या चेल्याचपाट्यांना हाताशी धरून अधिकारी आणि कंत्राटदारांना धमकावले जात आहे. कामे बंद पाडली जात आहेत. चौकशीच्या धमया दिल्या जातात. सरकारी बैठकांमध्ये, सार्वजनिक रित्या अपमानित करून धमकावले जात आहे, जे अशोभनीय आहे.पालकमंत्र्यांनी संगमनेर येथे जलजीवन मिशनच्या कामांची आढावा बैठक घेतली.
सन २०१९ ते २०२२ या माझ्या कार्यकाळात मंजूर कामे बंद पाडणे हाच या बैठकीचा हेतू होता. संगमनेर तालुयाची रचना, येथील राजकारण आणि कामांची पद्धत संपूर्ण राज्याला माहित आहे. ज्यांना स्वतःच्या तालुयातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, हे संगमनेरला येऊन बैठका घेऊन कामे बंद पाडतात हे हास्यास्पद आहे. पूर्वीपासून संगमनेर तालुयाचा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. या विकासाला गालबोट कसे लावता येईल किंवा विकास कसा थांबवता येईल हा बैठकीचा प्राधान्यक्रम होता.
जबाबदार मंत्री आणि नगर जिल्ह्यासारख्या सुजाण जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळणार्यांनी निदान बैठका घेताना पदाचा आब राखावा. पालकमंत्र्यांनी बैठकीत अजब गजब सूचना दिल्या आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कामे सुरू करू नका, भाजप नव्हे तर माझ्या कार्यकर्त्यांना, असे सांगण्याचा त्यांचा हेतू होता. मी १९८५ पासून राजकारणात आहे. आजवर मी अनेक पालकमंत्री बघितले. मात्र पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करायचे नाही, असा अजब फतवा काढणारे हे राज्यातले पहिलेच पालकमंत्री असावेत. २०१९ ते २०२२ या काळात मंजूर कामाच्या ठिकाणी स्वतःचे फोटो लावा, असे सांगणारे पालकमंत्री मी पहिल्यांदाच बघतो आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या तळेगाव दिघे पाणी योजनेचे टेंडर होऊन काम सुरू झाले होते, काल पालकमंत्र्यांनी बैठकीत हे काम बंद करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या आवडीच्या कंत्राटदारांना ते काम मिळावे असा त्यांचा हेतू होता. त्यांच्या वागण्यामुळे निळवंडे धरणाचे काम बंद पडले आहे. जिल्ह्याच्या विकासाला गालबोट लावल्याने जनतेत असंतोष आहे.
COMMENTS