मुंबई /नगर सह्याद्री - मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने...
मुंबई /नगर सह्याद्री -
मागील आठ ते नऊ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सत्तासंघर्षावरील सुनावणी संपली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मार्च महिना संपण्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता घटनातज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान अनेक प्रश्नांना शिंदे गटाच्या वकिलांना उत्तरं देता आली नाहीत. त्यामुळे हा निकाल महाविकास आघाडीच्या बाजुने लागेल, असा तर्क लावला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं आहे. कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी जर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, तर तुम्हाला या सरकारचे बारा वाजलेले दिसतील. म्हणून ‘ईडी पीडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे’ हा आमच्या आंदोलनातला नारा होता.अमोल मिटकरी पुढे म्हणाले, “सत्ताधीश हे अहंकारग्रस्त झाले आहेत. अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर हे सरकार तुम्हाला अपात्र झालेलं दिसणार आहे. हे सरकार अल्पावधीचं सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाला भारतीय राज्यघटनेच्या बाहेर जाता येत नाही. न्यायालयाला भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घ्यावा लागतो. निकाल त्यांच्या बाजुने लागणार असा त्यांना विश्वास असेल तर मग मंत्रालयातील फाईलींच्या हालचालींना वेग का आलाय? ही कशाची चिन्हं आहेत. आम्ही अस्वस्थ झालेलो नाहीत. आम्हाला विश्वास आहे. न्यायदेवता अजून जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालय घटनेला छेदून पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे हा निकाल आमच्याच बाजुने लागेल,
COMMENTS