अहमदनगर | नगर सह्याद्री- अलिकडच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकांकडून सोश...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
अलिकडच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही समाजकंटकांकडून सोशल मीडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केले जात आहेत. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मिडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा त्यांच्याविरूद्ध माहिती व तंत्रज्ञान कायदा २००० (आयटी अॅट) अन्वये कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिला आहे.
जिल्ह्यात धार्मिक तेढ निर्माण करणार्या घटना घडत आहे. नुकतीच शेवगाव तालुयात एक घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काही समाजकंटकांकडून जाणिवपूर्वक सोशल मिडियाव्दारे धार्मिक तेढ निर्माण करणारे व अफवा पसरविणारे अक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. सायबर पोलिसांचे यावर लक्ष आहे. नागरिक या मजकुराची कोणतीही शहानिशा न करता संदेश पुढे पाठवित असतात. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरून कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक शांतता भंग होण्याची शयता होत असते.
कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरून (व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आदी) अक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे कायदेशीर गुन्हा आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश कोणीही खात्री न करता सोशल मीडियाव्दारे प्रसारित करू नये, अन्यथा संबंधितांविरूद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असा इशार अधीक्षक ओला यांनी दिला आहे.
COMMENTS