मनसेचे संदीप देशपांडे यांचे खा. संजय राऊत यांना पत्र मुंबई | वृत्तसंस्था खासदार संजय राऊत यांनी मागील दोन दिवसांत भाजपा-शिंदे गटावर गंभीर आ...
मनसेचे संदीप देशपांडे यांचे खा. संजय राऊत यांना पत्र
खासदार संजय राऊत यांनी मागील दोन दिवसांत भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊत यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्ला त्यांनी या पत्राद्वारे दिला आहे.
संदीप देशपांडे पत्रात म्हणतात, तुमच्याबद्दल वाटणार्या काळजीपोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढळू लागतो. त्याची चीडचीड होते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारले तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी. आपण रोज पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या. असे करता येईल का, ते जरूर पाहा आणि ते जर शय नसेल तर पत्रकार परिषदेपूर्वी १० ते १५ मिनिटे योगा करा.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावले आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या र्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार पवार’ असे ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल. कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यतिगत संवाद होता, ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर विसरून जा, असे शेवटी या पत्रात म्हटले आहे.
COMMENTS