अहमदनगर | नगर सह्याद्री- २६ जानेवारी निमित्ताने अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसायटीची सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर आयोजित देश रंग...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
२६ जानेवारी निमित्ताने अहमदनगर सिंधी एज्युकेशन सोसायटीची सेंट विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल अहमदनगर आयोजित देश रंगीला आंतरशालेय देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेत जिल्ह्यातील २० शाळांचे संघ सहभागी झाले होते.न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, बेलापूर ता.श्रीरामपूर या शाळेने गट क्रमांक एक (इयत्ता ५वी ते ७ वी) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.
२६ जानेवारी रोजी ही स्पर्धा अहमदनगर मधील माऊली सभागृह येथे पार पडली. गट क्रमांक १ मध्ये स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्यातील आर्मी पब्लिक स्कूल, अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल, भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, चित्रकूट इंटरनॅशनल स्कूल, कर्नल परब स्कूल, गॅलेसी नॅशनल स्कूल, किशोर संस्कृत संवर्धिनी, मेहेर इंग्लिश स्कूल, माऊंट लिट्रा झी स्कूल, रेणाविकार शाळा, सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल, सखाराम मेहेत्रे शाळा, समर्थ विद्या मंदिर, रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन, सेंट मायकल इंग्लिश स्कूल, तक्षिला स्कूल, उद्धव अकॅडमी, नवीन मराठी शाळा विश्रामबाग आदी २० शाळांचा समावेश होता.
तर गट क्रमांक २ मध्ये १३ शाळा सहभागी होत्या. गट क्रमांक १ यामध्ये बेलापूर- श्रीरामपूर येथील न्याती समता इंटरनॅशनल स्कूल संघाने प्रथम क्रमांक मिळवला.त्यांच्या या यशाबद्दल पद्मश्री मा. पोपटराव पवार यांच्या हस्ते विजयी गटाला सन्मानचिन्ह, ट्रॉफी व धनादेश देण्यात आला. या समूह गीतात जयेश वाघ, स्वानंदी पाटील, श्रीजा काळे, समृद्धी बडाख, रुद्रा घोरपडे, आराध्या शिंदे, श्रुती पवार, अनिशा जगधने, वृंदा न्याती, श्रद्धा थोरात, रुद्रानी गोसावी, मुस्तफा रझा, श्रीराज देशमुख हे विद्यार्थी सहभागी होते.
त्यांना प्रशाळेतील संगीत शिक्षक उद्धव म्हस्के यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त स्वाती कोयटे, संदीप कोयटे, विद्यालयाचे संस्थापक अनिल न्याती, सचिव राकेश न्याती, मुकेश न्याती, शाळा समिती सदस्या कोमल न्याती, वैशाली न्याती, शैक्षणिक संचालक धनेश गांधी, उपप्राचार्या सोनल चौबे यांनी अभिनंदन केले.
ग्रामीण भागातही गुणवत्ता भरपूर
पालक नेहमीच ग्रामीण आणि शहरी शाळा अशी तुलना करताना दिसतात.आपला देश हा खेड्यापाड्यांचा बनलेला आहे.आपल्या मुलाला बेस्ट देण्याचा प्रत्येक पालकांचा प्रयत्न असतो.पण खेड्यातही गुणवत्ता कमी काही.बेलापूर( श्रीरामपूर ) हा तसा ग्रामीण भाग आहे पण तेथील विद्यार्थीही योग्य मार्गदर्शन आणि सराव ,जिद्द या जोरावर शहरी शाळांबरोबर स्पर्धा करू शकतात व जिंकू शकतात हे यांना मिळालेल्या क्रमांकावरून सिद्ध होत आहे.ग्रामीण भागातही गुणवत्ता , कला आणि कलाकार असतात त्यांना व्यासपीठावर आणि मार्गदर्शन मिळाले तर तेही स्वतः ला सिद्ध करू शकतात.असे म्हणत पदमश्री पोपटराव पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक आणि अभिनंदन केले.
COMMENTS