अहमदनगर । नगर सह्याद्री रब्बी हंगामाकरीता पाण्यासाठी शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून येत्या 10 जानेवारीपासून आवर्तन सोडण्याच...
अहमदनगर । नगर सह्याद्री
रब्बी हंगामाकरीता पाण्यासाठी शेतकर्यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेवून येत्या 10 जानेवारीपासून आवर्तन सोडण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
मुळा लाभक्षेत्रातील शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पीकांची लागवड केली आहे. पीकांना पाण्याची उपलब्धता व्हावी अशी मागणी शेतकरी, पाणी वापर संस्थानी खा. डॉ. विखे यांच्याकडे केली होती. त्यानूसार जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना सूचना देवून खा. विखे यांनी आवर्तन सुरू करण्यास सांगितले होते. विभागाच्या निर्णयाचा मोठा दिलासा शेतकर्यांना मिळणार आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून 10 जानेवारीपासून सुरू होणार्या आवर्तनाचा राहुरी, नेवासे, शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील सुमारे 25 हजार हेक्टर क्षेत्रातील गहू, कांदा, मका या पीकांना लाभ होणार आहे. आवर्तनाचे 35 दिवसांचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभधारक शेतकर्यांची पाण्याची निकड लक्षात घेवून सध्या सुरू असलेल्या बिगर सिंचन आवर्तनाला जोडूनच रब्बीचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या असल्याचे खा.डॉ विखे पाटील म्हणाले.
COMMENTS