नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यात एका कागदाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एक महिलेचा मृत्यू झाला.
मुंबई / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील नवी मुंबईतील ठाणे जिल्ह्यात एका कागदाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एक महिलेचा मृत्यू झाला असून, आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवानही भाजला. ही घटना शनिवारी पहाटे घडली असून या घटनेत कारखान्याचे एक युनिट उद्ध्वस्त झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐरोली परिसरात आगीची घटना घडली. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, रबाळे येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. शनिवारी पहाटे लागलेली आग काही तासांतच आटोक्यात आली.
आग विझवल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कारखान्याच्या परिसराची पाहणी केली असता त्यांना उर्मिला नाईक या महिलेचा जळालेला मृतदेह आढळून आला. ही महिला कारखान्याच्या स्वयंपाकघरात काम करायची.
आग विझवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचा एक जवानही भाजल्याचे जाधव यांनी सांगितले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी रबाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून आगीचे कारण शोधले जात आहे.
COMMENTS