मुंबई । नगर सह्याद्री - प्रेम कोणावरही होऊ शकते प्रेम हे आंधळे असते म्हटले जाते. प्रेमात जात, पात, धर्म बघितला जात नाही. कोण कधी कुणावर प्र...
मुंबई । नगर सह्याद्री -
प्रेम कोणावरही होऊ शकते प्रेम हे आंधळे असते म्हटले जाते. प्रेमात जात, पात, धर्म बघितला जात नाही. कोण कधी कुणावर प्रेम करेल हे सांगता येत नाही. काहीजण प्रेमात अक्षरश: वेडे होतात आणि घरदार सोडून पळून जातात. असाच एक धक्कादायक प्रकार राजस्थानमधून समोर आला आहे. सासूरवाडीला आलेला जावई चक्क सासूला घेऊन पसार झाला आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सासऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात ही घटना घडली आहे. येथील एका २७ वर्षीय तरुणाचे महिनाभरापूर्वी लग्न झाले होते.
आपल्या लाडक्या जावयाला जेवणाचं निमंत्रण द्यावं असं सासू-सासऱ्यांनी ठरवले. ठरल्यानुसार, जावई घरी आला. त्याने सासऱ्यासोबत दारूची पार्टी केली. रात्री सगळ्यांनी मटणावर ताव मारला आणि झोपी गेले. दरम्यान, आपल्यावर कुणाचे लक्ष नसल्याचे बघत जावई हा सासूला घेऊन फरार झाला.
जेव्हा सासरा शुद्धीवर आला तेव्हा त्याला घरात जावई दिसला नाही, त्याने शोध घेतला असता, बायको सुद्धा घरात दिसून आली नाही. आपली लाडकी बायको लाडक्या जावयासोबत फरार झाल्यानंतर सासऱ्याला धक्काच बसला त्याने तातडीने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ वर्षीय सासूचे लग्नाच्या आधीच २७ वर्षीय तरुणासोबत प्रेमसंबध होते. दोघांचाही एकमेकांवर जीव जडला होता. आपले नाते कायम टिकावे यासाठी सासूने एक प्लॅन आखला. तिने आपल्या मुलीचे लग्न या तरुणसोबत लावून दिले.
लग्नाच्या महिनाभरानंतर दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार सासरच्या मंडळींना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. आता पोलिस दोघांचा शोध घेत आहे.
COMMENTS