नवी दिल्ली / वृत्तसंस्था- धक्कादायक घटना दादरा आणि नगर हवेली येथे उघडकीस आली आहे. एका 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करुन नरबळी दिला. याप्रकरणी ...
नवी दिल्ली / वृत्तसंस्था-
धक्कादायक घटना दादरा आणि नगर हवेली येथे उघडकीस आली आहे. एका 9 वर्षाच्या बालकाचे अपहरण करुन नरबळी दिला. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. एका तांत्रिकाच्या सल्ल्यानुसार आरोपींनी नरबळी देण्यासाठी आधी मुलाचे अपहरण केले आणि मग त्याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले.
गुजरातमधील वापी शहराजवळ दमनगंगा नाल्यात एका मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला. तर सायली गावात तेथे तंत्रविद्या करण्यात आली होती तिथे मृतदेहाचे काही तुकडे सापडले. सर्व तुकडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला. हत्येचा तपास करण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकावर विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या.
हत्येचा तपास करत पोलीस एका किशोरवयीन आरोपीपर्यंत पोहचले. या मुलाला ताब्यात घेत पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता हत्या प्रकरणाचा खुलासा केला.
सायली गावातून पीडित मुलाचे 29 डिसेंबर 2022 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आपल्या साथीदारांच्या मदतीने 30 डिसेंबर 2022 रोजी मुलाची नरबळी देण्यासाठी हत्या केल्याचे आरोपी पोलिसांना सांगितले.मयत बालक आदिवासी वारली समाजातील होता. आरोपींविरोधात कलम 302, 201 आणि 102बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त केले आहे.
या हत्याकांडात शैलेश कोहकेरा आणि रमेश सांवर यांचाही समावेश असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शैलेश आणि रमेशला अटक केली. तर किशोरवयीन आरोपीला सूरतला ऑब्जर्वेशन होममध्ये पाठवण्यात आले आहे.
COMMENTS