तीन लहान मुले मात्र बेपत्ता: अपघात की घातपात? पारनेर | नगर सह्याद्री दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळलेल्या चार मृ...
तीन लहान मुले मात्र बेपत्ता: अपघात की घातपात?
पारनेर | नगर सह्याद्री
दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत मागील सहा दिवसांपूर्वी आढळलेल्या चार मृतदेहांची ओळख पटलेली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुयातील आहेत. भीमा नदी पत्रात हे मृतदेह आढळले होते. मात्र तीन लहान मुले बेपत्ता असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दौंड तालुयात भीमा नदीमध्ये चार मृतदेह आढळले होते. ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. या मृतदेहांची ओळख पटली असून ते नगर जिल्ह्यातील पारनेर तालुयातील आहेत. चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र या सर्वांसोबत असलेली आणखी तीन लहान मुले बेपत्ता आहेत.
मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. त्यांच्यासोबत चार वर्षांच्या आतील तीन लहान मुले आहेत, असे बोलले जाते. तीन मुले अद्याप बेपत्ता आहेत. हे कुटुंब मंगळवारी (दि. १७) रात्री अकरानंतर वाहनाने निघोज गावातून निघाले होते. शिरूर-चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुयातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात त्यांचे मृतदेह आढळले. १८ जानेवारीला एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर २०, २१ आणि २२ जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळले. त्यांच्यासोबत असलेल्या तीन लहान मुलांचा अद्याप शोध लागला नाही. आत्महत्या आहे की घातपात याचा तपास दौंड पोलीस करीत आहेत. २१ तारखेला एका स्त्रीचा मृतदेह आढळला. तसेच २२ तारखेला पुन्हा पुरुषाचा मृतदेह आढळला. सलग पाच दिवसात एकूण चार मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला. पोलीस प्रशासन देखील या घटनेने चक्रावले आहे. ही सामूहिक आत्महत्या आहे की मोठा घातपात, याबाबतचा तपास करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे आहे. मृत व्यक्तींसोबत त्यांची मुले असण्याचीही शयता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. यातील एका मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन आणि सोने खरेदीची पावती सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
COMMENTS