गनाला तिच्या बहिणीसोबत घडलेली एक अत्यंत क्लेशकारक घटना आठवली, ज्यानंतर तिने त्यावेळी वाटलेली भीती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली.
मुंबई / नगर सह्याद्री -
बॉलीवूडची क्वीन कंगना राणौत जी आपल्या स्पष्टपणे बोलण्यासाठी आणि आपले मत मांडण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच, मंगळवारी दिल्लीतील द्वारका येथे एका १७ वर्षीय मुलीवर ऍसिड हल्ला झाल्यानंतर कंगना रणौतचे हृदय हादरले आहे. कंगनाला तिच्या बहिणीसोबत घडलेली एक अत्यंत क्लेशकारक घटना आठवली, ज्यानंतर तिने त्यावेळी वाटलेली भीती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली.
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, 'मी किशोरवयीन असताना माझी बहीण रंगोली चंदेल हिच्यावर एका मुलाने ऍसिड फेकले होते... तिला ५२ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. एवढेच नाही तर तिला मानसिक आणि शारीरिक आघातही झाला होता. आम्ही एक कुटुंब म्हणून पूर्णपणे तुटलो होतो.... मला देखील थेरपी करावी लागली कारण मला भीती वाटत होती की माझ्या जवळून जाणारा कोणीही माझ्यावर ऍसिड फेकून देईल, त्यामुळे प्रत्येक वेळी दुचाकी किंवा कार माझ्याजवळून गेली की मी लगेच माझा चेहरा झाकून घेत असे. मी त्यावर मात केली....पण हे अत्याचार थांबले नाहीत....सरकारने या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे....मी गौतम गंभीरशी सहमत आहे, आपल्याला ऍसिडविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे हल्लेखोरांवर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.'
रांगोली आता विवाहित आहे आणि तिला पृथ्वीराज हा पाच वर्षांचा मुलगा आहे. ती अनेकदा चित्रपट कार्यक्रम आणि स्क्रीनिंगमध्ये जाते. हल्ल्याच्या वेळी ती २१ वर्षांची होती आणि ती थर्ड डिग्री भाजली होती. आणि रंगोलीचा अर्धा चेहरा जळाला होता, तिच्या एका डोळ्याची दृष्टी गेली होती, एक कान वितळला होता आणि एका स्तनाला गंभीर जखम झाली होती.
COMMENTS