मुंबई / नगर सहयाद्री भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे.पण प्रकरण एकाच गटाचं निघत आहे.त्यावरून फायली कोण देतंय हे समजून जा. आम्ह...
मुंबई / नगर सहयाद्री
भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे.पण प्रकरण एकाच गटाचं निघत आहे.त्यावरून फायली कोण देतंय हे समजून जा. आम्हाला भाजपचेच लोक फायली पुरवत आहेत,असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे.राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
अधिवेशनात सीमाप्रश्नाचा ठराव येणार होता.त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी सीमावादाचा ठराव येत असताना इतर कोणतेही विषय घेऊ नका म्हणून सांगितलं. त्यामुळे आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं विधानसभेत मांडली नाहीत.अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे तुमचेच सहकारी आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्यप्रकरणं बाहेर येतील, असा दावाही त्यांनी केला.
हा भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन पळणं फडणवीस आणि भाजपला जड होत असेल. हे सर्व लोक अलिबाबा चाळीस चोरमधले आहेत.हळूहळू चाळीस आमदारांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतील,असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान,आजही अधिवेशनात महाविकास आघाडीच्या आमदारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून सभागृह दणाणून सोडलं.विरोधकांनी विधानभवनाच्या पायरीवर जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं.दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरून दिल्या.
COMMENTS