मुंबई । नगर सह्याद्री - एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या तर दु...
मुंबई । नगर सह्याद्री -
एकीकडे सीमावर्ती भागातल्या चाळीस गावांवर कर्नाटकने दावा केला आहे. यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या तर दुसरीकडे पंढरपूरच्या नागरिकांनी चक्क कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. चंद्रभागेच्या तीरावर होणाऱ्या कॉरिडॉरला विरोध म्हणून नागरिक आक्रमक झाले आहे. आमच्या मागण्यांचा विचार केला नाही. तर येणाऱ्या आषाढीच्या महापूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंना बोलावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पंढरपूर कॉरिडॉरला विरोध करत नागरिकांनी आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले आहे. येणाऱ्या काळात यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.
वाराणसी आणि उज्जैनच्या धरतीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्याची घोषणा सरकारने केली आहे. या कामासाठी मंदिर परिसरातील तीनशे घरे आणि दोनशे दुकाने पाडण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे येथील नागरिक आणि व्यापारी धास्तावलेत. त्यांनी या कॉरिडॉरला विरोध सुरू केला आहे. प्रशासनाने याबाबत हरकती, सूचना मागवल्या. विकास आराखडा तयार केला आहे. मात्र, या साऱ्या कामात आम्हाला विश्वासात घेतला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंढरपूर बचाव समितीने याविरोधात आंदोलन छेडले आहे.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नुकतीच पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केली आहे. त्यासाठी तीनशे कोटींचा निधी राखून ठेवल्याचे ते म्हणाले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोघेही खर्च करणार आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात झालेल्या कामांच्या धर्तीवर येथे काम होणार आहे. पंढरपुरातल्या गल्ल्या, रस्ते, घाट, मठ, मंदिरे, पालखी मार्ग, चंद्रभागा तीराचा विकास करण्याचा मानस आहे.
पंढरपूर कॉरिडॉरसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 1500 कोटींच्या ऑनलाइन निविदा मागविल्यात. त्यासाठी उद्या 26 डिसेंबर पर्यंत निविदा भरता येणारायत. या निविदा 29 डिसेंबर रोजी उडण्यात येणार आहे. टाटासह तब्बल 15 कंपन्यांनी या कामात उत्सुकता दाखवली आहे. त्यामुळे विरोधी तीव्र होताना दिसतोय. यापू्र्वी नागरिकांनी मोर्चा काढत विरोध केला आहे. आताही नागरिकांनी आपली दुकाने, घरांवर काळे फलक लावत निषेध सुरू केला आहे.
COMMENTS