अहमदनगर / नगर सह्याद्री - जमीन व्यवहारातील २५ हजार रूपये न दिल्याने एका तरूणाला मारहाण करत त्याचे अपहरण करण्यात आले आहे. रौनक सुभाष चुडीवा...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
जमीन व्यवहारातील २५ हजार रूपये न दिल्याने एका तरूणाला मारहाण करत त्याचे अपहरण करण्यात आले आहे. रौनक सुभाष चुडीवाल (वय ३३, रा. धरतीचौक) असे अपहरण झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगलसिंग संतोषसिंग धारीवाल (रा. वडारवाडी, भिंगार), सनी शंकर निकाळजे (रा. गौतमनगर, भिंंगार नाका, भिंगार) व अभी शंकर वाघेला (रा. नेहरू कॉलनी, भिंगार) अशी आोपींची नावे आहेत. सुभाष चुनिलाल चुडीवाल (वय ७०) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्लॉट खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवहारामध्ये मुलगा रौनक त्यांना मदत करतो. रौनक याने मंगलसिंग संतोषसिंग धारीवाल यांचे आईचे भाऊ देवराम भागाजी गायकवाड (रा. पिंपळगाव वाघा, ता. नगर) यांची नऊ एकर जमीन विकत घेतली होती. त्या जमिनीचे पैसे भाव हिश्याप्रमाणे दिले होते. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा रौनक घरी असताना धारीवाल, निकाळजे, वाघेला तेथे आले. त्यातील मंगलसिंग धारीवाल फिर्यादीला म्हणाले, तुमचा मुलगा रौनक याने पिंपळगाव वाघा येथील नऊ एकर जमीन विकत घेतली असून त्याचे भाव हिश्याप्रमाणे आमचे २५ हजार रूपये देणे बाकी आहे, ते आम्हाला आजपर्यंत दिले नाहीत. जो पर्यंत पैसे देत नाही, तो पर्यंत आम्ही तुमचा मुलगा रौनक यास बरोबर घेऊन जात आहोत, असे म्हणून रौनक यास बरोबर घेऊन जात असताना फिर्यादी यांनी त्याला विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ दमदाटी करून रौनक यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुचाकीवरून घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत.
COMMENTS